आपण आपल्या आयुष्यातील सरासरी पंधरा वर्षे निव्वळ शिक्षणासाठी घालवतो, म्हणजे आपल्या देशाच्या सरासरी आयुष्यमानाप्रमाणे सुमारे २५ टक्के आपले आयुष्य शिक्षणासाठी घालवतो. हे जे शिक्षण आपण घेतो त्याचा आपल्या धर्मात सांगीतल्याप्रमाणे आत्म उन्नत्तिसाठी फायदा होतो. मुक्ति साठी फायदा होतो.
आपल्या शिक्षण पद्धति बद्दल आपल्याला काय वाटते? सध्या जी मूलं शालेत, कॉलेज मध्ये शिकतात किंवा शालेत, कॉलेज मध्ये जातात ते फक्त परीक्षेत ज्यादा गुण मिळविण्यासाठी की त्या शिक्षणाचा उपयोग आपल्या पुढील आयुष्यात करण्यासाठी?
वर्षभर शालेत, कॉलेज मध्ये जाणे अन परीक्षा जवळ आली म्हणजे जोरात अभ्यासाला लागणे, हे कशाचे द्योतक आहे.
आपल्या शिक्षण व्यवस्थेतसुद्धा केवळ परीक्षेसाठी म्हणुन सुट्टी का दिली जाते? हे जाहिर करण्यासाठी की वर्षभर मजा करा आणि परिक्षेच्या सुट्टीत अभ्यास करा, व केवळ certificate मीळविण्यासाठी?
आता तर असे पहायला मिळते की ज्याच्याकडे उच्च शिक्षणाचे certificate आहे त्याला त्या विषया बद्दल माहिती नसते किंवा जुजबी माहीत असते पण त्या certificate च्या आधारावर त्याला नोकरी मिळते. पण ज्यांच्याकडे त्या विषयाबद्दल माहिती असते व जे eligible असताना सुद्धा जे बेकार असतात ते?
Saturday, October 10, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment