Tuesday, October 25, 2011
Wednesday, October 19, 2011
Sunday, October 16, 2011
Wednesday, October 12, 2011
Monday, October 10, 2011
रिटयर्डमेंट टाइम
जे फक्त नोकरी आणि घर या मध्येच अडकलेले असतात, ते आता काहीही करायचे नाही या विचारानेच खचून जातात, व एकलकोंडेपणा जवळ करतात.
जे आपल्या ठराविक नोकरीच्या दरम्याने नोकरीव्यतीरीक्त इतर कामात आपले मन गुंतवतात त्यांचे निवृत्तीनंतरचे वेळापत्रक ठरलेले असते, ते मग या नविन साच्याला जवळ करतात.
Sunday, October 9, 2011
अश्वथामा आणि दूध एक प्रश्न.
महाभारतात असा एक प्रसंग आहे की अश्वथामा लहान असताना पांडवाना दूध पीताना पहातो, व घरी आल्यावर आपल्या आईकडे दूधासाठी हट्ट करतो. घरात त्याला द्यायला दूध नसते व दुध घे॓ण्याची त्यांची ऐपतही नसते, मग त्याची आई पाण्यात पीठ (कदाचित ज्वारीचे असेल) कालवून अश्वथाम्याला ते दूध आहे असे संगून प्यायला देते, अश्वथामा ते दूध असे समजून आनंदाने पीतो.
- अश्वथाम्याचे वडील गुरु द्रोणाचार्य तर कौरव व पांडव यांचे गुरु अन हस्तिनापूरचे राजगुरु मग त्यांना एवढेही मानधन मीळत नव्हते का ?
- श्रीकृष्णाच्या त्या काळात दूध एवढे महाग होते का ?
या कथेमागच मतीतार्थ काय ?
आत्मा अमर आहे का
तर या आत्मा नामक मुलाला शाळेत बसल्या बसल्या पेंगळण्याची सवय असते.
एकदा काय होते, तो मुलगा देवळात एका प्रवचनाला जातो, प्रवचनाचा विषय असतो ‘शरीर आणि आत्मा’ बोलता बोलता प्रवचनकार सहज मोठ्याने म्हणतो ‘आत्मा अमर आहे का’ तेवढ्यात हा आत्मा नावाचा मुलगा पेंगळलेल्या अवस्थेतून दचकून जागा होतो अन जागेवरुन उभा रहात हात वर करुन मोठ्याने म्हणतो ‘हजर गुरुजी’
Friday, October 7, 2011
कीती बदलला ना तो ?
एखाद्या माणसाबद्दल आपण आपले आडखे मांडत असतो, अमूक एखादा माणूस अमक्या तर्हेनेच चालणार, बोलणार, वागणार, त्याचे वर्तन आपण गृहीत धरलेल्या आपल्या साचीव आडाख्यातच आसणार हे आपण पक्के ठरवलेले असते. काही वेळेला आपण आपल्या मनात त्याच्या वागण्याबद्दल ठरवलेले विचार त्याच्या समोर मांडतो देखील.
तो माणूस जरासुद्धा आपाल्या ठरवलेल्या आडख्याच्या बाहेर वागला तर आपण लगेच आपली प्रतिक्रया व्यक्त करतो, ‘’कीती बदलला ना तो ?’’
आत्मा
जो आत्मा असतो तो विशीष्ट धेय घेउन देहात प्रवेशकर्ता झालेला असतो, पण तो आत्मा या जगात आल्यावर इथल्या विलोभनीय संबंधांच्या नात्यात गुंतून राहतो, व आपले कार्य विसरुन जातो. या देहाच्या मर्यादेप्रमाणे त्याल कोठे न कोठे तरी थांबवे लागते, पण जो आत्मा असतो त्याला थांबणे मान्य नसते, व जेव्हा देह ठेवल्या नंतर तो दुसरा देह शोधतो, आणि हे चालू राहते
Wednesday, October 5, 2011
त्यानी चित्रगुप्तला विचारले.
काय झाले चित्रगुप्त महाराज.
चित्रगुप्त म्हणाले. ‘काय सांगू, तुम्हा सगळ्यांना पृथ्वीवर परत जन्माला घालायचे आहे, पण काय करणार, पृथ्वीवर सध्या तुमच्या योनीची संख्या फुल्ल झालेली आहे, पण तुम्हाला तर आत्ताच पाठवायचे आहे, काय करायचे ते कळतच नाही’
त्यानी चित्रगुप्ताना विचारले ‘अहो चित्रगुप्त महाराज, माणसांचीही फुल्ल झाली आहे का ?’
चित्रगुप्त म्हणाले ‘माणसाच्या खूप जागा आहेत.’
ते परत म्हणाले ‘अहो चित्रगुप्त महाराज, मग त्यात काय मोठे आहे, तुम्ही आम्हाला माणसांच्या योनीत पाठवाना.’
चित्रगुप्त म्हणाले ‘असे कसे करता येईल, हे तुम्हाला गाढव, डुक्कर, माकड, कोल्हा, लांडगा, गीधाड, जळू (जे रक्त शोषून घेते ते) म्हणून जन्म घायचा आहे, अन तुम्ही माणूस म्हणून जन्म घेउ पहात आहात’
यावर ते म्हणाले ‘अहो चित्रगुप्त महाराज, तुम्ही आम्हाल माणूस म्हणून पाठवले तरी आम्ही आमचा गुणधर्म थोडाच सोडणार आहोत, आम्ही आम्हाला गाढव, डुक्कर, माकड, कोल्हा, लांडगा, गीधाड, जळू (जे रक्त शोषून घेते ते) म्हणून जगायचे होते त्याच तर्हेने जगणार.
हे त्यांचे म्हणणे चित्रगुप्तांना आवडले अन ते म्हणाले ‘मला आवडले, मी आता तुम्ही म्हणता तसेच करतो, चला मोठ्ठा गुंता सुटला.’
सध्या जी काही माणसे आपण पहातो ती याचाच परीणाम आहे असे आपल्याला वाटते का ?